
अनुक्रमणिका
- श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ६. ओवी क्र. ३९ ते ६१
- श्रीएकनाथी भागवत क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ५, ओवी क्र. २५८ ते ३००
- द्वेष (२८१, २८२)
- अज्ञानी व सज्ञानी (२८३)
- विषयी ज्ञानाभिमानी (२८४)
- काम्यकर्मकर्ते अभक्त (२८५ ते ३००)
- श्रीतुकाराम महाराजांची गाथाअभंग क्र. ८५७ ते ८७६
- ग्रंथ
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ६. ओवी क्र. ३९ ते ६१
अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः । स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ॥१॥
सांडिजे दुजया नामाचा आभासु । तरी योगु तोचि संन्यासु । पाहतां ब्रह्मीं नाहीं अवकाशु । दोहींमाजी ॥४०॥
जैसें नामाचेनि अनारिसेपणें । एका पुरुषातें बोलावणें । कां, दोहीं मार्गीं जाणें । एकाचि ठाया ॥४१॥
नातरी, एकचि उदक सहजें । परि सिनाना घटीं भरिजे । तैसें भिन्नत्व जाणिजे । योग-संन्यासांचें ॥४२॥
आइके, सकळ संमतें जगीं । अर्जुना पाहें तोचि योगी । जो कर्में करूनि; रागी । नोहेचि, फळीं ॥४३॥
जैसी मही हे उद्भिजे । जनी, अहंबुद्धीविण सहजें । आणि तेंथींचीं तियें बीजें । अपेक्षीना ॥४४॥
तैसा, आम्नायाचेनि आधारें । जातीचेनि अनुकारें । जें जेणें अवसरें । करणें पावे ॥४५॥
तें तैसेंचि उचित करी । परि साटोपु नोहे शरीरीं । आणि बुद्धीही, करोनि, फळवेरी । जायेचिना ॥४६॥
ऐसा तोचि संन्यासी । पार्था गा, परियेसीं । तोचि भरंवसेनिसीं । योगीश्वरू ॥४७॥
वांचूनि उचित कर्म प्रासंगिक । तयातें म्हणे “हें सांडावें, बद्धक’ । तरी टांकोटांकीं आणिक एक । मांडीचि तो ॥४८॥
जैसा क्षाळुनियां लेपु एकु । सवेंचि लाविजे आणिकु । तैसेनि आग्रहाचा पाइकु । विडंबे वायां ॥४९॥
गृहस्थाश्रमाचें वोजें । कपाळीं आधींचि आहे सहजें । कीं तेंचि संन्याससवा ठेविजे । सरिसें पुढती ॥५०॥
म्हणौनि अग्निसेंवा न सांडितां । कर्माची रेखा नोलंडितां । आहे योगसुख स्वभावतां । आपणपां ॥५१॥
जेथ संन्यासिला संकल्पु तुटे । तेथचि योगाचें सार भेटे । ऐसें हें अनुभवाचेनि धटें । साचें जया ॥५३॥
[Image of the eight limbs of yoga (Ashtanga Yoga) diagram]
येणें यमनियमांचेनि तळवटें । रिगे आसनाचिये पाउलवाटें । येईं प्राणायामाचेनि आडखंठें । वरौता गा ॥५५॥
मग प्रत्याहाराचा अधाडा । जो बुद्धीचियाही पायां निसरडा । जेथ हटिये सांडिती होडा । कडेलग ॥५६॥
तरी अभ्यासाचेनि बळें । प्रत्याहारीं निराळें । नखीं लागेल ढाळें ढाळें । वैराग्याची ॥५७॥
ऐसा पवनाचेनि पठारें । येतां धारणेचेनि पेंसारें । क्रमी ध्यानाचें चवरें । सांडे तंव ॥५८॥
मग तया मार्गाची धांव । पुरेल प्रवृत्तीची हांव । जेथ साध्यसाधना खेव । समरसें होय ॥५९॥
जेथ पुढील पैसु पारुखे । मागील स्मरावें, तें ठाके । ऐसिये सरिसिये भूमिके । समाधि राहे ॥६०॥
येणें उपायें योगारूढु । जो निरवधि जाहला प्रौढु । तयाचिया चिन्हांचा निवाडु । सांगेन; आइके ॥६१॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ५, ओवी क्र. २५८ ते ३००
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
सुख भोगावया वेगीं । पतंगु जेवीं उडी घाली आगीं । तेवीं इहामुत्रभोगीं । पतनालागी पावती ॥२५९॥
स्त्री-आमिष-मद्यपान । हे वेदोक्त भोग जाण । तेथ केवीं घडे पतन । तें वेदविधान नेणती मूर्ख ॥२६०॥
एवं व्यवायः प्रजया न रत्या इमं विशुद्धं न विदुः स्वधर्मम् ॥१३ ॥
(सौत्रामणी वगैरे यागांमध्ये सुरेचे प्रत्यक्ष पान न करिता तिचा नुसता वास घ्यावा असे सांगितले आहे. त्याचप्रमाणे पशुहिंसा सांगितली नसून फक्त पशुस्पर्शन करावे असे श्रुती सांगते. (स्वधर्मरक्षणार्थ) पुत्रोत्पत्तीकरिता स्त्रीसंभोग विहित आहे, केवळ रतिसुखाकरिता शास्त्रकारांनी संभोग सांगितला नाही. असे हे वेदरहस्य, म्हणजे विशुद्ध असा हा स्वधर्म, विषयी लोकांना समजत नाही.॥१३ ॥)
वेदींच्या अर्थवादासरिसा । मनीं बांधोनि भोगाशा । यज्ञमिषे पशुहिंसा । भोगलिप्सा करूं धांवती ॥२६२॥
वेदें बोलिलें ‘आलभन’ । त्या नांव म्हणती पशुहनन । हे सकाम मानिती विधान । निष्कामा हनन कदा न घडे ॥२६३॥
निष्कामासी यागयजन । स्वधर्मार्थ करावे यज्ञ । तेथ पशूचें आलभन । सर्वथा हनन करूं नये ॥२६४॥
पशूचे करूं नये हनन । देवतोद्देशे अंगस्पर्शन । या नांव बोलिजे ‘आलभन’ । हे यज्ञाचरण निष्काम ॥२६५॥
हरिश्चंद्राच्या यागीं । शुनःशेप-पशुप्रसंगी । तेणें घावो लागों नेदितां अंगीं । वेदोक्त प्रयोगी यज्ञसिद्धी केली ॥२६६॥
वेदोक्तमंत्रभागार्थ । देव सुखी करोनि समस्त । आपण झाला निर्मुक्त । हा ऋग्वेदार्थ ब्राह्मणीं ॥२६७॥
यापरी पशुघात । यज्ञी न लगे निश्चित । तो हरिश्चंद्र यागार्थ । पशुघात निवारी ॥२६८॥
तेथ मीमांसकांचे मत । देवतोद्देशे जो पशुघात । या नांव ‘आलभन’ म्हणत । स्वर्गफलार्थ आवश्यक ॥२६९॥
केवळ मांसभक्षणार्थ । जे करिती पशुधात । हिंसादोष तेथें प्राप्त । ऐसें बोलत मीमांसक ॥२७० ॥
देवतोद्देशे पशूचा घात । तेणें स्वर्गभोग होय प्राप्त । तोही भोगक्षयें क्षया जात । तेणें हिंसा प्राप्त याज्ञिकां ॥२७१॥
याग करितां ‘सौत्रामणी’ । पुरोडाश घ्यावा अवघ्राणीं । परी प्रवर्तावें सुरापानीं । हे वेदविधानी असेना ॥२७२॥
एवं जेथें पशुहनन । तें कर्म सदोष पूर्ण । यालागी तेथ अधःपतन । बोलिलें जाण याज्ञिकांसी ॥२७३॥
वेदें विहिले पाणिग्रहण । तें प्रजार्थ स्वदारागमन । परी रत्यर्थ नित्य मैथुन । हे वेदाज्ञा जाण असेना ॥२७४॥
मद्य-मांस-मैथुनप्रसंग । स्वइच्छा न करावया भोग । वेदें द्योतिला विवाह याग । भोगत्यागनियमार्थ ॥२७५॥
नेणोनि ऐसिया शुद्ध धर्मा । यागमिषें अधर्मा । प्रवर्तोनि काम्यकर्मा । भोग संभ्रमा भोगिती मूर्ख ॥२७६॥
(परंतु हा शुद्धधर्म न जाणणारे जे दुराचारी, तामसी, आपण म्हणतो तेच खरे असा दुरभिमान बाळगणारे, निःशंक पशुंचा द्रोह करून वध करतात, ते पुढे मेल्यानंतर त्यांनी मारलेले पशू परलोकी या पशुधात्यांना मारून त्यांचे मांस खातात. (तात्पर्य : हेच त्यांना यज्ञाचे फल मिळते.)॥१४॥)
केवळ अभिचारमतें । पावोनि सकळ भोगातें । ऐसिया मानोनि विश्वासातें । स्वेच्छा पशूतें घात करिती ॥२७८॥
अविधी पशूतें वधिती । त्या याज्ञिकांचे देहांतीं । मारिले पशू मारूं येती । झळकत काती घेऊनियां ॥२७९ ॥
एवं निमालिया याज्ञिकांसी । भक्षिले पशु भक्षिती त्यांसी । जैसे सेविलें विष प्राणियांसी । ग्रासी प्राणांसी समूळ ॥२८०॥
द्वेष (२८१, २८२)
(आपल्याप्रमाणेच) दुसऱ्यांच्या शरीरामध्येही असणारा, सर्वसामर्थ्यवान, पाप हरण करणारा, केवळ आत्मरूपच अशा परमात्म्याचा जे द्वेष करतात व आपले स्त्रीपुत्रादी आप्तेष्ट व हे मर्त्य शरीर ह्यांच्यावर मोहाने आसक्त होऊन प्रेम करतात ते घोर नरकात पडतात. ॥१५॥)
परासी जो करी अपघातु । तेणें केला निजात्मघातु । त्यासी सकुटुंब अधःपातु । रौरवांतु ते बुडती ॥२८२ ॥
अज्ञानी व सज्ञानी (२८३)
(ज्यांना आत्मस्वरूपाची प्राप्ती झालेली नाही, व जे मूढ अवस्थेच्याही पलीकडे गेलेले आहेत, म्हणजे केवळ अज्ञानी नाहीत तर अर्धवट ज्ञानसंपन्न आहेत, असे त्रैवर्णिक धर्म-अर्थ-काम हे पुरुषार्थच नित्य आहेत असे मानून आपला घात करून घेतात. ॥१६॥।)
विषयी ज्ञानाभिमानी (२८४)
काम्यकर्मकर्ते अभक्त (२८५ ते ३००)
देहाचिया गोमटिया । जे करिती अभिचारक्रिया । तेणें कर्मे आपआपणियां । सृजिला राया निजघातु ॥२८६॥
जो स्वयें बैसली खांदी तोडी । तो खांदीसहित पडे बुडीं । तेवीं काम्यकर्माच्या वोढी । क्रियेसी रोकडी अधःपात ॥२८७॥
(असे हे आत्मघातकी, क्रूर कर्मामुळे उच्छृंखल झालेले, अज्ञानातच वावरत असून स्वतःला ज्ञानी समजणारे, कर्तव्यकर्मे न केल्यामुळे अस्वस्थ राहिलेले लोक इच्छिलेले सर्व मनोरथ कालौघात उद्ध्वस्त झाल्यामुळे निराशेने शेवटी खरोखर नाश पावतात. ॥१७॥)
स्वयें कर्म करिती अविधी । तेचि म्हणती शुद्ध विधी । अज्ञान तेंचि प्रतिपादी । ज्ञान त्रिशुद्धी म्हणोनियां ॥२८९॥
ते काम्यकर्मी छळिले । कां महामोहें आकळिले । गर्वदंभादि भेदें खिळिले । काळसर्पे गिळिले सद्बुद्धीसीं ॥२९०॥
गर्वादिज्वरितमुखें । गोडपणी कडू ठाके । विषप्राय विषयसुखें । अतिहरिखें सेविती ॥२९१॥
ऐशा विषयांलागी पहाहो । आप्त मानूनि निजदेहो । रचूनि नाना उपावो । अर्थसंग्रहो स्वयें करिती ॥२९२ ॥
((तेच विवरण करून सांगतात—) गृह, अपत्य, नातेवाईक आणि संपत्ती ही अत्यंत परिश्रमाने जमविलेली सुखाची साधने सोडून जावे लागल्यानंतर भगवंताला विसरलेले हे जीव आपली इच्छा नसताना नरकात प्रविष्ट होऊन दुःखे भोगत राहतात. ॥१८॥)
ऐसे भोग आयासयुक्त । सांडूनि ज्ञानगर्वी समस्त । ज्ञानाभिमानें नेइजेत । अंधतमांत अतिगर्वे ॥२९४॥
जेथ अंधाराचे डोळे । होऊनि ठाकती आंधळे । तेथ मोहरात्रीचे काळें । अंधतममेळे अधिक कांटे ॥२९५॥
जया अंधारातें प्रकाशू येतां । निखिळ काळा होय सविता । जेथ गाढ मूढ अवस्था । अतिमौढ्यता स्वयें पावे ॥२९६॥
जेथ सुषुप्तीसी झोंप लागे । आळसु आळसिजे सर्वांगें । तेथ घर बांधोनि निजांगें । निंदा क्रोध दोघे सदा वसती ॥२९७ ॥
तेथ भजनविमुख नरां । अधःपतन अभिमानद्वारा । जेवीं अथावी पडिला चिरा । तेवीं बाहेरा निघों न शके ॥२९८॥
जे वासुदेवीं सदा विमुख । ज्यांसी हरिभजनीं नाहीं हरिख । त्यांची दशा हे अधोमुख । अतिदुःखें दुःख भोगिती ॥२९९ ॥
ऐशी अभक्तांची गति । सांगितली आहाच स्थिति । वांचूनि त्यांची दुर्गति । वाग्देवता भीती स्पष्ट वदतां ॥३०० ॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. ८५७ ते ८७६
मनुष्यदेहा ऐसा ठाव। धरी पांडुरंगीं भाव ॥ध्रु॥
बहु केला फेरा। येथे सांपडला थारा॥३॥
तुका म्हणे जाणे। ऐसे दुर्लभ ते शाहाणे ॥४॥
आम्हां लडिवाळां नाहीं तें प्रमाण। कांहीं ब्रह्मज्ञान आत्मस्थिति ॥ध्रु॥
वचनाचा घेईन अनुभव पदरीं । जे हे जनाचारी मिरवलें॥३॥
तुका म्हणे माझी भोळिवेची आटी। दावीन शेवटी कौतुक हें ॥४॥
शींव वाटे परि न खंडें पृथिवी । शाहाणे ते जीवीं समजती ॥ध्रु॥
पोटा आले तिच्या लोळे मांडिवरी । पारखी न करी खंती चित्तीं ॥३॥
तुका म्हणे भक्तिसाठी हरिहर । अरूपीचे क्षर विभाग हे ॥४॥
फळ आणि समाधान । तेथें उत्तम कारण ॥ध्रु॥
अल्प तो संतोषी । स्थळी सांपडे उद्देशीं ॥३॥
सहज संगम । तुका म्हणे तो उत्तम ॥४॥
ऐसा योगियांचा धर्म । नव्हे वाढवावा श्रम ॥ध्रु॥
न कळे आवडी । कोण आहे कैसी घडी ॥३॥
तुका म्हणे थीतें । दु:ख पाववावें चित्तें ॥४॥
आनंदाची पुष्टि अंगीं । श्रोते संगी उद्धरती ॥ध्रु॥
पिकलें तया खाणे किती । पंगतीस सुकाळ ॥३॥
तुका करी प्रणिपात । दंडवत आचारियां ॥४॥
ऐसा माजल्याचा गुण । भोगें कळों येईल शीण ॥ध्रु॥
वाढवी ममता । नाहीं वरपडला तो दूतां ॥३॥
न मनी माकड । कांहीं उपदेश हेकड ॥४॥
मोडे तरी भले खेळ । फांके फांकिल्या कोल्हाळ॥ध्रु॥
जाणणियासाठीं । भय सामावले पोटीं ॥३॥
तुका म्हणे चेता। होणें तें तूंच आयता ॥४॥
ठायीं राहिल्या निश्चळ। आहे अचळी अचळ ॥ध्रु॥
एके हाकेच्या कपाटीं । तेथें आणीक नाद उठी ॥३॥
अभ्रे धांवे शशी । तुका म्हणे दुसरे भासी ॥४॥
एके ठायीं मूळडाळ । ठावा सकळ आहेसी ॥ध्रु॥
तुमचे आमचेंसें कांहीं । भिन्न नाहीं वांटलें ॥३॥
तुका म्हणे जेथें असें । तेथें दिसें तुमचासा ॥४॥
येरयेरांवरी जायांचें उसणें । भाग्य-स्थळी देणे झाडा वेसी ॥ध्रु॥
केलीया फावला ठायींचा तो लाहो । तृष्णेचा तो काहो काहवितो ॥३॥
तुका म्हणे लाभ अकर्तव्या नांवें । शिवपद जीवें भोगिजेल ॥४॥
नासोनियां गेली खंती। सहज स्थिती भोगाचे ॥ध्रु॥
न देखेंसें झाले श्रम। आले वर्म हाता हें ॥३॥
तुका म्हणे कैंची कीव । कोठें जीव निराळा? ॥४॥
काम वाढे भय वासनेच्या द्वारें । सांडावें तें धीरें आचावाचा॥ध्रु॥
कांपवूनि टिरी शूरत्वाची मात । केलें वाताहात उचित काळे ॥३॥
तुका म्हणे करी जिव्हेसी विटाळ । लटिक्याची मूळ स्तुति होतां ॥४॥
मातेचिये खांदी बाळ नेणे शीण । भावना त्या भिन्न मुंडाविया ॥ध्रु॥
नको गुंफों भोगी, नको पडों त्यागीं । लावूनि सरे अंगी देवाचिया ॥३॥
तुका म्हणे नको पुसों वेळोवेळां । उपदेश वेगळा उरला नाहीं ॥४॥
सावधान सावधान । उगवीं संकल्पी हें मन ॥ध्रु॥
सांडिले ते मांडे । आग्रह उरल्या, काळ दंडे ॥३॥
तुका म्हणे आलें भागा । देऊनि चिंती पांडुरंगा ॥४॥
उगीच लागतील पाठीं । होती रितींच हिंपुटीं ॥ध्रु॥
शिक-विल्या गोष्टी । शिकोन न धरिती पोटीं ॥३॥
तुका म्हणे शीण । होईल, अनुभवाविण ॥४॥
होणार तें घडो होणाराच्या गुणें। होईल नारायणें निर्मिले तें ॥ध्रु॥
व्याघ्राचिये भुके वधावी ते गाय । याचें नांव काय पुण्य असे? ॥३॥
तुका म्हणे न करी विचार पुरता । गरज्याची मातापिता खर ॥४॥
उपदेश असे बहुतां कारणे । घेतला तो मने पाहिजे हा ॥ध्रु॥
फांसावेना तरि दु:ख घेतें वाव। मग होतो जीव कासावीस ॥३॥
तुका म्हणे नको राग धरूं झोंडा! । नुघडितां पीडा होईल डोळे ॥४॥
रूपाच्या आठवें दोन्हीही आपण । वियोग तो क्षण होत नाहीं ॥ध्रु॥
पूजा तरि चित्तें कल्पावें ब्रह्मांड । अहाच तो खंड एकदेशी ॥३॥
तुका म्हणे माझा अनुभव यापरी । डोई पायांवरी ठेवीतसें ॥४॥
नाहीं तरि काय कळलेंचि आहे । वाघ आणि गाय लांकडाची ॥ध्रु॥
अभेदचि असे, मांडियेलें खेळा । केल्या दीपकळा बहु एकी ॥३॥
तुका म्हणे रूप नाहीं दर्पणांत । संतोषाची मात दुसरीं ती ॥४॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.








रामकृष्णहरी माऊली 🙏