
अनुक्रमणिका
- श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ६. ओवी क्र. ३१६ ते ३४०
- श्रीएकनाथी भागवत क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ६, ओवी क्र. २५१ ते २९७
- निजधामास येण्याची देवांची विनंती कृष्ण मान्य करतो (२६३ ते २८०)
- यादवकुळनाशाचा श्रीकृष्णाचा संकल्प (२६७ ते २७४)
- निजधामाला जाण्याच्या श्रीकृष्णाच्या आश्वासनाने देवांना आनंद (२७५ ते २८०)
- द्वारकेत महोत्पात (२८१ ते २९२)
- कृष्ण यादवांस प्रभासास पाठवितो (२९३ ते ३१६)
- श्रीतुकाराम महाराजांची गाथाअभंग क्र. १०५४ ते १०७०
- ग्रंथ
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ६. ओवी क्र. ३१६ ते ३४०
जैं कहीं दैवें । अनुभविलें फावे । तैं आपणचि हें ठाकावें । होऊनिया ॥३१७॥
पुढती जाणणें तें नाहींचि । म्हणौनि असो किती हेंचि । बोलावें आतां वायांाचि । धनुर्धरा ॥३१८॥
ऐसें शब्दजात माघौतें सरे । तेथ संकल्पाचें आयुष्य पुरे । वाराही जेथ न शिरे । विचाराचा ॥३१९॥
जें उन्मनियेचें लावण्य । जें तुर्येचें तारुण्य । अनादि जें अगण्य । परमतत्त्व ॥३२०॥
जें विश्वाचें मूळ । जें योगद्रुमाचें फळ । जें आनंदाचें केवळ । चैतन्य गा ॥३२१॥
जें आकाराचा प्रांतु । जें मोक्षाचा एकांतु । जेथ आदि आणि अंतु । विरूनि गेले ॥३२२॥
जें महाभूतांचें बीज । जें महातेजाचें तेज । एवं पार्था जें निज- । स्वरूप माझें ॥३२३॥
तें हें चतुर्भुज कोंभावली । जयाची शोभा रूपा आली । देखोनि नास्तिकीं नौकिली । भक्तवृंदें ॥३२४॥
तें अनिर्वाच्य महासुख । पैं आपणचि जाहले जे पुरुष । जयांचे कां निष्कर्ष । प्राप्तीवेऱ्हीं ॥३२५॥
आम्हीं साधन हें जें सांगितलें । तेंचि शरीरीं जिहीं केलें । ते आमुचेनि पाडें आले । निर्वाळलेया ॥३२६॥
परब्रह्माचेनि रसें । देहाकृतीचिये मुसें । ओतींव जाहलें तैसें । दिसती आंगें ॥३२७॥
जरी हे प्रतीति हन अंतरीं फांके । तरी विश्वचि हें अवघें झांके । तंव अर्जुन म्हणे ‘निकें । साचचि जी हें’ ॥३२८॥
कां जें आपण आतां देवो । हा बोलिले जो उपावो । तो प्राप्तीचा ठावो । म्हणोनि घडे ॥३२९॥
इये अभ्यासीं जे दृढ होती । ते भरंवसेनि ब्रह्मत्वा येती । हें सांगतियाची रिती । कळलें मज ॥३३०॥
देवा गोष्टीचि हे ऐकतां । बोधु उपजतोसे चित्ता । मा अनुभवें तल्लीनता । नोहैल केवीं? ॥३३१॥
म्हणौनि येथ कांहीं । अनारिसें नाहीं । परि नावभरी चित्त देईं । बोला एका ॥३३२॥
आतां कृष्णा तुवां सांगितला योगु । तो मना तरी आला चांगु । परि न शके करूं पांगु । योग्यतेचा ॥३३३॥
सहजें आंगिक जेतुलें आहे । तेतुलियाची जरी सिद्धी जाये । तरी हाचि मार्ग सुखोपायें । अभ्यासीन ॥३३४॥
नातरी देवो जैसें सांगतील । तैसें आपणपें जरी न ठकेल । तरी योग्यतेविण होईल । तेंचि पुसों ॥३३५॥
जीवीं चिये ऐसी धारण । म्हणौनि पुसावया जाहलें कारण । मग म्हणे “तरी आपण । चित्त देईजो ॥३३६॥
हां हो जी अवधारिलें । जें हें साधन तुम्हीं निरूपिलें । तें आवडतयाहि अभ्यासिलें । फावों शके ? ॥३३७॥
कीं योग्यतेविण नाहीं । ऐसें हन आहे कांहीं ?” । तेथ श्रीकृष्ण म्हणती “काई । धनुर्धरा ! ॥३३८॥
हें काज कीर निर्वाण । परि आणिकहि जें कांहीं साधारण । तेंहि अधिकाराचे वोडवेविण । काय सिद्धी जाय ? ॥३३९॥
पैं योग्यता जे म्हणिजे । ते प्राप्तीचि अधीन जाणिजे । कां जे योग्य होऊनि कीजे । तें; आरंभिलें फळे ॥३४०॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ६, ओवी क्र. २५१ ते २९७
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
(हे जगदीशा, तू द्वापराच्या शेवटी ज्या लीला केल्यास, त्या लीलांचे श्रवण आणि कीर्तन करून साधुलोक कलियुगात सहज तरून जातील. ॥२४॥)
कलियुगी साधुजन । या चरित्रांचे श्रवण कीर्तन । करितां तरले जाण । मायामोह त्रिगुणेंसीं ॥२५२॥
(हे पुरुषश्रेष्ठा, यादववंशामध्ये अवतार घेऊन तुला एकशे पंचवीस वर्षे होऊन गेली. ॥२५॥)
मृत्युलोकीं मनुष्यमर्यादा । शत वर्षे जी गोविंदा । ते अतिक्रमोनि आवदा । अधिक मुकुंदा पंचवीस जाहलीं ॥२५४॥
(हे प्रभो, अखिल प्राणिमात्रांचा तूच आधार आहेस. आता देवकार्यापैकी शिल्लक असे काही राहिले नाही. ब्राह्मणांच्या शापाने हे यादवकुल नाश पावल्यासारखेच झालेले आहे. ॥ २६ ॥)
उठवणी आले हतिरुं । कां पांख उपडिल्या पांखरूं । तैसा यादवांचा दळभारू । भूमिये भारु उरला असे ॥२५६॥
निवणाचा फुटका डेरा । कां क्षयो लागल्या राजकुमरा । वणवा आहाळल्या अजगरा । यादववीरां ते दशा ॥२५७ ॥
दारुण ब्राह्मणाचा शाप । नाशला वीर्यशौर्यप्रताप । गळाला वाढिवेचा दर्प । केवळ प्रेतरूप दिसताती ॥२५८ ॥
(म्हणून तुझे परम श्रेष्ठ जे वैकुंठस्थान त्याप्रत जर तुझी इच्छा असेल तर चलावे आणि चतुर्दश भुवने व त्यांचे अधिपती जे आम्ही वैकुंठदास त्यांचे पालन करावे. ॥ २७ ॥)
ऐकें देवकीनंदना । जरी मानेल तुझिया मना । तरी निधिजो जी याचि क्षणा । सुरसेना तिष्ठत ॥२६० ॥
सलोक लोकपाळ जे जे । त्यांवरी तुवां कृपा कीजे । आम्ही किंकर गा तुझे । वचन मानिजे दासांचें ॥२६१ ॥
ऐकें जी वैकुंठनाथा । तुझी थोर आम्हां अवस्था । आदिकरूनि उमाकांता । आणि समस्तां देवांसी ॥२६२॥
निजधामास येण्याची देवांची विनंती कृष्ण मान्य करतो (२६३ ते २८०)
(श्रीभगवान म्हणाले -हे सुरश्रेष्ठ ब्रह्मदेवा, तू जे काही बोललास ते मी ऐकले. तुमचे सर्व कार्य मी केले असून भूमीचा सर्व भार मी हलका केला आहे. ॥२८॥)
नादब्रह्म मुसावलें । की निजानंदाचें फळ पिकलें । तैसें श्रीमुखें बोलों आदरिलें । भाग्य उदेलें श्रवणांचें ॥२६४॥
गौरवें म्हणे ‘ब्रह्मदेवा । संतोषलों तुझिया भावा’ । पुत्रस्नेहेंकरूनि तेव्हां । उद्यत खेवा हरि जाला ॥२६५ ॥
आवडी म्हणे विबुधेंद्रा । सत्य तुझी वाङ्मुद्रा । तुझेनि वचनें ब्राह्मणेंद्रा । धराभारा उतरिलें ॥२६६॥
यादवकुळनाशाचा श्रीकृष्णाचा संकल्प (२६७ ते २७४)
यद्यसंहृत्य दृप्तानां यदूनां विपुलं कुलम् । गन्तास्म्यनेन लोकोऽयमुद्वेलेन विनङ्क्ष्यति ॥३०॥
(शक्ती, पराक्रम आणि संपत्ती यांनी हे यादवकुल उन्मत्त झाले असून सर्व त्रैलोक्य जिंकून पादाक्रांत करण्याची हाव धरीत आहे. समुद्राला घातलेली मर्यादा ज्याप्रमाणे त्याच्या विस्ताराला अडविते त्याप्रमाणे ह्या यादवकुलाला मी रोधून ठेवलेले आहे. ॥२९॥ मस्त झालेल्या यादवांच्या विस्तार पावलेल्या कुलाचा नाश न करिता जर मी वैकुंठाला गेलो तर ही पृथ्वी त्यांच्या अन्याय्य अतिक्रमणाने नाश पावेल. ॥३०॥)
हे छेदूं पाहती धर्ममूळे । म्यां आवरिले असती योगबळे । जेवीं समुद्रातें मर्यादवेळे । असे राखिले नेमूनी ॥२६९ ॥
सांडोनि ऐशियांसी । मज गेलिया निजधामासी । हे प्रवर्ततील अधर्मासी । कोण यांसी वारील ॥२७० ॥
जैसा निर्मर्याद सागरू । खवळल्या सर्वसंहारकरू । त्यासी कोण शकेल आवरूं । तैसा विचारू होईल ॥२७१॥
हे अधर्मपर होतील गाढे । तुम्हांसी पडेल सांकडें । सांगों धांवाल मजपुढे । यांचें रोकडें गाऱ्हाणें ॥२७२ ॥
हे नाटोपती देवां । नाकळती दैत्यां दानवां । हे अधर्म करिती जेव्हां । तुम्हीच मज तेव्हां सांगों याल ॥२७३॥
(आता ब्राह्मणाच्या शापामुळे कुलाचा नाश सुरू झालाच आहे. हे विमल ब्रह्मदेवा, हा नाश पुरता करून नंतर मी (आपल्या स्थानाला जाताना) तुझ्या धामाला येईन. ॥३१॥)
निजधामाला जाण्याच्या श्रीकृष्णाच्या आश्वासनाने देवांना आनंद (२७५ ते २८०)
ऐसें बोलिला प्रभू । ऐकोनि शंभु स्वयंभू । आनंदला देवकदंबू । समारंभू मांडिला ॥२७६ ॥
जयजयकारु केला सकळीं । परमानंदें पिटिली टाळी । चरण वंदूनि वनमाळी । पुष्पांजळी अर्पिल्या ॥२७७॥
(श्रीशुकाचार्य म्हणाले– याप्रमाणे त्रैलोक्यनाथ बोलल्यानंतर ब्रह्मदेवाने त्याला नमस्कार केला; आणि देवगणांसह तो आपल्या लोकास (ब्रह्मलोकास) निघून गेला. ॥३२॥)
धाता सविता शूळपाणी । मिळोनियां देवगणीं । कृष्णासी घातल्या लोटांगणीं । चरण वंदूनी निघाले ॥२७९ ॥
एवं वंदूनी श्रीपती । आपुलिया स्थानाप्रती । निघाल्या जी देवपंक्ती । पवनगती विमानें ॥२८०॥
द्वारकेत महोत्पात (२८१ ते २९२)
(थोड्याच कालात, द्वारकेमध्ये मोठमोठे अशुभसूचक उत्पात उत्पन्न झालेले पाहून भगवान एकत्र जमलेल्या यादवकुलातील वृद्ध माणसांना म्हणाले ॥३३॥)
गगनीं निघाले त्रिकेतु । धूमकेतु दंडकेतु । शिखेसहित शिखाकेतु । गगनाआंतु उगवले ॥२८२ ॥
माध्यान्हीं वाजला आघात । दिवसा उल्कापात होत । होत भूतें नागवीं नाचत । गगनाआंत रुदती ॥२८३॥
वृक जंबुक नगराआंत । दिवसा चौबारा कुंकात । नगरी भालुवा भुंकत । जन कांपत देखोनी ॥२८४॥
नगरा आंतुबाहेरी । श्वानांची रडणी भारी । मार्जारकलहो नगरीं । घरोघरी होतसे ॥२८५॥
गाई आरडती मध्यरात्रीं । लेकुरे खेळती झुंझारी । माणसांतें झडपिती घारी । घुंघाती घरोघरी दिवाभीतें ॥२८६॥
वागीश्वरी क्षोभली गाढी । बोली म्हणती आली यमधाडी । कां रे धांवतां तांतडी । आगी उडी घालूं पाहतां ॥२८७॥
भूस्फोट भूमिकंप । अग्निकिरणी तपे आतप । वारेनि सोडिला अहा कंप । लागे झडप खरस्पर्शे ॥२८८॥
धुळोरा उधळत नगरीं । रज भरे डोळ्यांमाझारी । डोळा नुघडवे नरनारी । दिशा चारी धुमधुमित ॥२८९॥
ऐसे नाना परींचे उत्पात । नगरी रुधिरवृष्टि होत । देखोनि यादव समस्त । भयचकित पैं जाहले ॥२९० ॥
यादव मिळोनि थोर थोर । वृद्ध वृद्ध करिती विचार । ये चिन्हें अरिष्टकर । विन्न थोर दिसतसे ॥२९१॥
अवघे आले कृष्णापाशीं । वृत्तांत सांगती तयासी । उद्विग्न देखोनि यादवांसी । हृषीकेशी बोलिला ॥२९२ ॥
कृष्ण यादवांस प्रभासास पाठवितो (२९३ ते ३१६)
(श्रीभगवान म्हणाले – येथे सर्व बाजूंनी भयंकर मोठे उत्पात (अशुभ प्रकार) होत आहेत; आपल्या कुलाला अनुल्लंघनीय असा ब्राह्मणांचा दुर्धर शाप झालेला आहे. ॥ ३४ ॥)
देखोनियां चिन्हांसी । मजही आठवलें मानसीं । ब्राह्मणशाप यदुकुळासी । चिन्हें त्यासी सूचकें ॥२९४ ॥
ब्राह्मणांचा शापु खरा । नुल्लंघवे हरिहरां । तुम्ही आतांचि विचार करा । नगराबाहिरा जनु काढा ॥२९५॥
(म्हणून, हे वृद्ध यादवहो, आपणा सर्वांना जगण्याची इच्छा आहे, तरी आपण येथे राहता उपयोगी नाही; आपण आजच फार उशीर न लावता पुण्यकारक अशा प्रभास क्षेत्राला जाऊ या ॥३५॥)
वेगीं करा रे तांतडी । आजचि निघा लवडसवडी । सांडा घरदारांची गोडी । येथ अर्धघडी न रहावें ॥२९७॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. १०५४ ते १०७०
ये वो ये वो पांडुरंगें! । प्रेमपान्हा मज दे गे ॥ध्रु॥
पसरूनि चोंची । वचनें ही करुणेचीं ॥३॥
तुका म्हणे बळी । आम्ही लडिवाळे आळीं ॥४॥
रूप दाखवीं रे आतां । सहस्रभुजांच्या मंडिता ॥ध्रु॥
शंखचक्रपद्मगदा । गरुडासहित ये गोविंदा! ॥३॥
तुका म्हणे कान्हा! । भूक लागली नयनां ॥४॥
तुझें रूप माझे मनीं । राहो, नाम जपो वाणी ॥ध्रु॥
ब्रह्मांडनायका । विश्वजनाच्या पाळका! ॥३॥
जीवींचिया जीवा! । तुका म्हणे देवदेवा! ॥४॥
लागो हाचि छंद । मना ‘गोविंद गोविंद’ ॥ध्रु॥
तुका म्हणे मना! । मज भीक द्यावी दीना ॥३॥
नाम धरिलें ‘दीनानाथ’ । सत्य करावया व्रत ॥ध्रु॥
घातआघात निवारी । छाया पीतांबर करी ॥३॥
उभा कर कटीं । तुका म्हणे याजसाठीं ॥४॥
ऐसियासी शरण जावें । शक्ती जीवें न वंची ॥ध्रु॥
भीष्मपण केला खरा । धनुर्धरा रक्षिलें ॥३॥
तुका म्हणे साक्ष हातीं । तो म्यां चित्तीं धरियेला ॥४॥
तैसें करीं वो माझे आई! । ठाव देऊनि राखें पायीं ॥ध्रु॥
काढितां तळमळी । जीवनाबाहेरी मासोळी ॥३॥
तुका म्हणे कुडी । जीवा प्राणांची आवडी ॥४॥
रूपा येऊनियां धरी अवतार । भक्तां अभय-करखळां कष्ट ॥ध्रु॥
दुर्वास हा छळू आला अंबऋषी । सुदर्शन त्यासी जाळित फिरे ॥३॥
द्रौपदीच्या क्षोभे कौरवांची शांति । होऊनि श्रीपति साह्य केली ॥४॥
न साहेचि बब्रु पांडवां पारिखा । दुराविला सखा बळिभद्र ॥५॥
तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधि । अश्वत्थामा वधी पांडवपुत्रां ॥६॥
जपे हरिनाम बीज। तोचि वर्णांमाजी द्विज ॥ध्रु॥
तुका म्हणे वर्णधर्म । अवघे आहे सम ब्रह्म॥३॥
आम्हां विठ्ठल जीवन। टाळ चिपुळिया धन ॥ध्रु॥
‘विठ्ठल विठ्ठल’ वाणी । अमृत हे संजीवनी ॥३॥
रंगला या रंगें । तुका विठ्ठल सर्वांगें ॥४॥
भाग्यवंता छंद मनीं । कोड कानीं ऐकती ॥ध्रु॥
विठ्ठल हे दैवत भोळे । चाड काळे न धरावी ॥३॥
तुका म्हणे भलते याती । विठ्ठल चित्तीं तो धन्य! ॥४॥
मग तो हो कां कोणी एक । आदि करोनि ब्रह्मादिक ॥ध्रु॥
नाहीं विठ्ठल जया ठावा। तोही डोळां न पहावा ॥३॥
तुका म्हणे नाहीं । त्याची भीड मज कांहीं ॥४॥
मारा हाक देवा भय अट्टाहासें । जंव काळाऐसे झाले नाहीं ॥ध्रु॥
मरणाची तंव गांठोडी पदरीं । जिणें तोचिवरी माप भरे ॥३॥
तुका म्हणे धिग, वाहती मारग । अंगा आले मग हालों नेदी ॥४॥
म्हणऊनि तया न वजावें ठाया । होतसे घात या दुर्बळाचा ॥ध्रु॥
भावहीना आड येतसे आशंका। उचितासी चुका घालावया॥३॥
तुका म्हणे जया संकोच दर्शनें । तया ठाया जाणे अनुचित ॥४॥
हेंडग्याच्या आळां अवघीं चिपाडें । काय तेथें गोडें निवडावीं ॥२॥
ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना । मूर्खत्व वचना येऊ पाहे ॥३॥
तुका म्हणे मद्य सांडवी लंगोटी । सांगितला सेटी विचार त्या॥४॥
राही रखुमाई सत्यभामा माता । पांडुरंग पिता माहियेर ॥२॥
उद्धव अक्रूर व्यास अंबऋषि । भाई नारदासी गौरवीन ॥३॥
गरुड बंधु लडिवाळ पुंडलीक । यांचे कवतुक वाटे मज ॥४॥
मज बहु गोत संत आणि महंत । नित्य आठवीत ओवियेसी ॥५॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान चांगया । जिवलगा माझिया नामदेवा ॥६॥
नागो जगमित्रा नरहरि सोनारा । रोहिदास कबिरा सोईरिया ॥७॥
परिसा भागवता सुरदास सांवता । गाईन नेणतां सकळिकांसी ॥८॥
चोखामेळा संत जिवाचे सोईरे । न पडे विसर यांचा घडी ॥९॥
जीवींच्या जीवना एका जनार्दना । पाठक हा कान्हा मिराबाई ॥१०॥
आणीकही संत महानुभाव मुनि । सकळां चरणी जीव माझा ॥११॥
आनंदें ओविया गाईन मी त्यांसी । जाती पंढरीसी वारकरी ॥१२॥
तुका म्हणे माझा बळिया बापमाय । हर्षें नांदे सये घराचारीं ॥१३॥
ते काय गुण लागती येरां? । कागा न शोभे पिंजरा ॥ध्रु॥
शिक-विलें तें सुजात सोसी। मग मोल चढे त्यासी ॥३॥
तुका म्हणे वेषधारी । हिजड्या नव्हती त्या नारी ॥४॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.






रामकृष्णहरी माऊली 🙏
रामकृष्णहरी माऊली 🙏