
अनुक्रमणिका
- श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ६. ओवी क्र. ३४१ ते ३६३
- श्रीएकनाथी भागवत क्रमश: नित्यनेम पारायण अध्याय – ६, ओवी क्र. २९८ ते ३५०
- कृष्णाने यादवांस प्रभासास का पाठविले ? (३१७ ते ३२०)
- उद्धवाची कृष्णास विनंती व स्तुती (३२१ ते ३३१)
- श्रीकृष्णविरहाच्या कल्पनेने उद्धवाची विव्हळ मन:स्थिती (३३२-३५०)
- श्रीतुकाराम महाराजांची गाथाअभंग क्र. १०७१ ते १०८४
- (मासिक पारायण सातवा विसांवा)
- ग्रंथ
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
जयांचे केलिया स्मरण । होय सकळ विद्यांचे अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥१॥
ते नमस्कारोनि आता ॥
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीविठ्ठलाय नमः ।
श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
रामकृष्णहरि । रामकृष्णहरि । रामकृष्णहरि ॥
श्रीज्ञानेश्वरी नित्यनेम पारायण
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ६. ओवी क्र. ३४१ ते ३६३
नावेक विरक्तु । जाहला देहधर्मीं नियतु । तरि तोचि नव्हे व्यवस्थितु । अधिकारिया? ॥३४२॥
येतुलालिये आयणीमाजिवाडें । योग्यपण तूतेंही जोडे’ । ऐसें प्रसंगें सांकडें । फेडिलें तयाचें ॥३४३॥
मग म्हणे “पार्था । ते हे ऐसी व्यवस्था । अनियतासि सर्वथा । योग्यता नाहीं ॥३४४॥
अथवा आग्रहाचिये बांदोडी । क्षुधा तृषा कोंडी । आहाराते तोडी । मारूनियां ॥३४६॥
निद्रेचिया वाटा न वचे । ऐसा दृढिवेचेनि अवतरणें नाचे । तें शरीरचि नव्हे तयाचें ! । मा योगु कवणाचा? ॥३४७॥
म्हणौनि अतिशयें विषयो सेवावा । तैसा विरोधु न व्हावा । कां, सर्वथा निरोधावा । हेंही नको ॥३४८॥
मितला बोलीं बोलिजे । मितलिया पाउलीं चालिजे । निद्रेही मानु दीजे । अवसरें एके ॥३५०॥
जागणें जरी जाहलें । तरी होआवें तें मितलें । येतुलेनि धातुसाम्य संचलें । असेल सहजें ॥३५१॥
ऐसें युक्तीचेनि हातें । जैं इंद्रियां वोपिजे भातें । तैं संतोषासि वाढतें । मनचि करी ॥३५२॥
जैसें भाग्याचिये भडसें । उद्यमाचेनि मिसें । मग समृद्धिजात आपैसें । घर रिघे ॥३५४॥
तैसा, युक्तिमंतु कौतुकें । अभ्यासाचिये मोहरा ठाके । आणि आत्मसिद्धीचि पिके । अनुभवु तयाचा ॥३५५॥
म्हणौनि युक्ति हे पांडवा । घडे जया सदैवा । तो अपवर्गीचिये राणिवा । अळंकारिजे ॥३५६॥
तयातें योगयुक्त तूं म्हण । हेंही प्रसंगें जाण । तें दीपाचें उपलक्षण । निवातींचिया ॥३५८॥
आतां, तुझें मनोगत जाणीवोनी । कांही एक आम्ही म्हणौनि । तें, निकें चित्त देऊनी । परिसावें गा ॥३५९॥
तूं प्राप्तीची चाड वाहसी । परि अभ्यासीं दखु नव्हसी । तें, सांग पां, काय बिहसी । दुवाडपणा? ॥३६०॥
तरी पार्था हें झणें । सायास घेशी हो मनें । वायां बागुल, इयें दुर्जनें । इंद्रियें करिती ॥३६१॥
पाहें पां, आयुष्यातें अढळ करी । जें सरतें जीवित वारी । तया औषधातें वैरी । काय जिव्हा न म्हणे? ॥३६२॥
ऐसें हितासि जें जें निकें । तें सदाचि या इंद्रियां दुखे । एऱ्हवीं, सोपें योगासारिखें । कांहीं आहे? ॥३६३॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीएकनाथी भागवत
क्रमश: नित्यनेम पारायण
अध्याय – ६, ओवी क्र. २९८ ते ३५०
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॥
(याच तीर्थात स्नान करून तारकांचा पती जो चंद्र त्याचा दक्ष प्रजापतीच्या शापामुळे झालेला क्षय तत्काळ नाहीसा झाला आणि त्याला पुनः कला प्राप्त झाल्या. ॥ ३६॥)
दक्षे निजकन्या चंद्रासी । सत्तावीस दिधल्या त्यासी । तो रतला रोहिणीसीं । येरां सर्वांसी उपेक्षुनी ॥२९९ ॥
दक्षे शापिलें चंद्रासी । क्षयरोगु लागला त्यासी । तेणें येऊनि प्रभासासी । स्नानदानासी पैं केलें ॥३००॥
स्नानमात्रे केवळ । क्षयरोग गेला तत्काळ । कळा पावला सकळ । शोभे निर्मळ निजतेजें ॥३०१॥
(आपणही त्या तीर्थात स्नान करून, पितरांना आणि देवांना तर्पणाने संतुष्ट करू या, आणि गुणवान व आदरणीय अशा ब्राह्मणांना सुग्रास अन्न देऊन भोजन घालू या. ॥३७॥)
नाना परींची पक्वान्ने । गुणाधिक्य मिष्टान्ने । देवां ब्राह्मणांसी भोजनें । नाना दानें विधानोक्त ॥३०३॥
(सत्पात्र ब्राह्मणांना मोठमोठाली दाने भक्तिभावाने देऊन त्या दानांनी ही महाभयंकर विघ्ने नाहीशी करण्यास नावेच्या साहाय्याने ज्याप्रमाणे समुद्र तरून जाता येतो त्याप्रमाणे समर्थ होऊ. ॥ ३८ ॥)
ब्राह्मणाचे मुख तें क्षेत्र । पालवियेपेढीवीण पवित्र । ऐसें पाहूनि सुक्षेत्र । दानें विचित्र पेरावी ॥३०५॥
विनीततेची सेल वोल । श्रद्धेचे चाडें निर्मळ । शमदमादि बैल सबळ । ते तात्काळ जुंपोनी ॥३०६॥
ऐशिया वोजा परी । बीज पेरिलिया क्षेत्रीं । पीक पिकेल घुमरीं । पुरुषार्थ चारी लगटोनी ॥३०७॥
त्या पिकाचेनि सबळे । पापें तरोनि पैं सकळे । जेवीं नावेचेनि बळें । समुद्रजळें तरिजेती ॥३०८॥
(श्रीशुकाचार्य म्हणाले-हे कुलभूषण परीक्षिते, याप्रमाणे भगवंतांनी आज्ञा केल्यानंतर यादवांनी प्रभास क्षेत्राला जाण्याचा निश्चय करून आपापले रथ जोडले. ॥३९॥)
यादव उठिले गाढे । रथीं जुंपिले जी घोडे । येर धांवती येरांपुढे । चहूंकडे लगबग ॥३१० ॥
(भगवान कृष्णावर सर्वकाळ अनन्य प्रेम करणाऱ्या उद्धवाने हे सर्व पाहिले, भगवंताचे भाषण ऐकले, मोठे मोठे उत्पात अवलोकन केले – ॥४०॥)
हडबडली देखोनि द्वारावती । ऐक राया परीक्षिती । उद्धवास आठवलें चित्तीं । कृष्णवदंती देवांसी ॥३१२॥
कुळनाशासी त्वरित । आजीपासूनि सुमुहूर्त । तोचि देवें प्रस्तुत । कार्यार्थ निश्चित मांडिला ॥३१३॥
उद्धव कृष्णासवें संतत । कृष्णानुमतें तो वर्तत । सुरसंवाद निश्चित । होता श्रुत तयासी ॥३१४ ॥
असतां येथ कृष्णनाथ । द्वारकेमाजी अतिउत्पात । उठिले तें मनोगत । जाण निश्चित कृष्णाचें ॥३१५॥
यादव नेऊनि प्रभासासी । अर्धक्षणे नाशील यांसी । जावया निजधामासी । हृषीकेशी उद्यत ॥३१६॥
कृष्णाने यादवांस प्रभासास का पाठविले ? (३१७ ते ३२०)
यादव देवांश निश्चितीं । सातवी पुरी द्वारावती । येथ निमाल्या सायुज्यमुक्ती । हे जाणोनि श्रीपति न नाशी ॥३१८॥
यांसी आहे पदाभिमान । द्वारकेमाजी न घडे निधन । हे जाणोनि जगज्जीवन । करवी प्रयाण प्रभासासी ॥३१९॥
ब्रह्मशापाचें मूळ देखा । प्रभासासी निघाली ते येरिका । हे कळलेंसे यदुनायका । तेथ सकळिकां धाडिलें ॥३२० ॥
उद्धवाची कृष्णास विनंती व स्तुती (३२१ ते ३३१)
बाष्पे कंठ निरोधला । नेत्री अश्रूंचा पूर लोटला । स्वेदु सर्वांगीं चालिला । हृदयीं दाटला हुंदका ॥३२२ ॥
कृष्णवियोग अर्ध क्षण । तेणें निघों पाहे प्राण । विसरला कार्य आठवण । कृष्णवदन निरीक्षी ॥३२३ ॥
वियोगप्राप्तीचे बाण प्रबळ । हृदयीं रुतले अतिसबळ । बुद्धि धैर्येसीं होती विकळ । जीवीं तळमळ लागली ॥३२४॥
एकांत देखोनि श्रीकृष्णासी । धांवोनि लागला पायांसी । मिठी घालोनि चरणेसीं । उकसाबुकसी स्फुदत ॥३२५ ॥
(आणि अखिल जगाचा महान स्वामी अशा त्या भगवान कृष्णपरमात्म्याला त्याने एकांतात गाठले, त्याच्या दोन्ही पायांवर शिरसाष्टांग नमस्कार घातला, व हात जोडून तो बोलता झाला. ॥ ४१॥)
(उद्धव म्हणाला – हे देवाधिदेवा, हे योगेश्वरा, हे पुण्यश्लोका यदुवीरा, खरोखर ह्या सर्व कुलाचा संहार करून तू हा लोक सोडून जाणार आहेस असे मला वाटते; तू महान समर्थ आहेस. ब्राह्मणांचा शाप परत फिरविणे तुला शक्य असूनसुद्धा तू तो फिरविला नाहीस. ॥४२॥)
देवांमाजी इंद्र ईशु । त्या इंद्राचा तूं जगदीशु । योगियांमाजी श्रेष्ठ महेशु । त्याचाही ईशु तूं श्रीकृष्णा ॥३२८॥
तुझें जें श्रवणकीर्तन । तें पुण्यासी करी पावन । छेदी संसारबंधन । समाधान कीर्तनें ॥३२९॥
संहारूनि निजकुळासी । सांडोनियां या लोकासी । निजधामा जावों पाहसी । हृषीकेशी निश्चित ॥३३० ॥
(हे केशवा, तुझे चरणकमल सोडण्यास अर्धक्षणसुद्धा मी तयार नाही. हे नाथ, मलाही तुझ्याबरोबर तुझ्या स्थानाला घेऊन जा. ॥४३॥)
श्रीकृष्णविरहाच्या कल्पनेने उद्धवाची विव्हळ मन:स्थिती (३३२-३५०)
माथा ठेविला चरणांवरी । सखा स्वामी तूं श्रीहरी । आम्हांसी सांडूनियां दुरी । कैशापरी जासील ॥३३३ ॥
तुझिया प्रयाणाची वार्ता । ऐकतांचि गा अच्युता । उभड सांठवेना चित्ता । वियोग सर्वथा न व्हावा ॥३३४ ॥
जळावेगळी मासोळी । तैसा जीवु तळमळी । निष्ठुर जाहलासी अंतकाळीं । वनमाळी मजलागीं ॥३३५॥
तुज गेलियापाठीं । मी दीनवदन ये सृष्टीं । कोणासी सांगों गोड गोष्टी । श्वासु पोटीं न समाये ॥३३६॥
निघोनि गेलिया आत्मा । प्रेतरूप उरे प्रतिमा । तुवां गेलियां निजधामा । तैसें आम्हां होईल ॥३३७॥
तूंचि आम्हां जनक जननी । हा दृढ विश्वास आमुचे मनीं । केवी जातोसी सांडोनि । म्हणोनि लोळणी घातली ॥३३८॥
तूं निघालासी निजधामा । कोणासी निरविलें जी आम्हां । कां रुसलासी पुरुषोत्तमा । बोलु निजकर्मा आमुच्या ॥३३९ ॥
मुकें बाळ सांडोनि क्षितीं । माता रिघों पाहे सती । तें जेवीं ये काकुळती । तैसी गती उद्धवा ॥३४० ॥
गोडु गिळी आमिषकवळु । सवेंचि पारधी आंसुडी गळु । त्या मीनाऐसा विकळु । होय प्रेमळु उद्धव ॥३४१॥
तुज गेलियावरी देवा । म्यां कोणाची करावी सेवा । कां रुसलासी गा यादवा । आमच्या दैवा निश्चित ॥३४२॥
कांटवणे आड क्षितीं । आंधळे सांडूनि जाये सांगाती । तें ग्लानी करी वनांतीं । तैसी गती उद्धवा ॥३४३॥
धांवधावों पायां पडे । धाय मोकलोनि रडे । मज सांडोनि तूंचि पुढे । कोणीकडे जातोसी ॥३४४॥
मी नव्हे पायांवेगळा । क्षण नोसंडी चरणकमळा । तुझें प्रयाण जी गोपाळा । अंतकाळा मज काळु ॥३४५॥
तुझी थोर लागली सवे । मज न्यावें आपणासवें । हेचि प्रार्थीतसें जीवेंभावें । कृपा यादवें मज कीजे ॥३४६॥
तूं गरुडारूढ होसी । तेव्हां कृपेनें बैसवीं पाठीसीं । सांडों नको हृषीकेशी । निजधामासी मज नेई ॥३४७॥
सलगी दिधली जन्मवरी । अंती का त्यागिसी दुरी । कृपाळुवा श्रीहरी । कृपा करीं सर्वथा ॥३४८॥
म्हणसी मी निजकुळासी काळु । तो तुज केवीं होईन कृपाळु । हे न म्हणें तूं दीनदयाळु । अतिस्नेहाळु भक्तासी ॥३४९॥
तुझी कृपा भक्तांवरी । यालागीं मी सलगी करीं । मातें उद्धरीं श्रीहरी । झणे संसारी सांडिसी ॥३५० ॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
श्रीतुकाराम महाराजांची गाथा
अभंग क्र. १०७१ ते १०८४
नाहीं देखिला ना ठावा। तोंडपिटी करी हांवा ॥ध्रु॥
फुगतें काउळें । म्हणे ‘मी राजहंसा आगळें’॥३॥
गजाहूनि खर। म्हणे ‘चांगला मी फार’॥४॥
मुलाम्याचे नाणें । तुका म्हणे नव्हे सोने ॥५॥
पाप पुण्य अंगीं घेतले जडून । वर्म नेणें, कोण करिता तो ॥ध्रु॥
तुका म्हणे गेलें व्यर्थ वायांविण । जैसा मृग शीण मृगजळीं ॥३॥
राग आळवितो नाना । गातो काय ते कळेना ॥ध्रु॥
आशा धरोनि मनीं । कांहीं देईल म्हणऊनि ॥३॥
पोटा एका साठीं । तुका म्हणे झाले कष्टी ॥४॥
ऐसें कळलें आम्हां एक । झालों नामाचे धारक ॥ध्रु॥
तपाचे सायास । न लगे घेणें वनवास॥३॥
तुका म्हणे येणें । कळिकाळ हे ठेंगणे ॥४॥
(मासिक पारायण सातवा विसांवा)
कामक्रोध अहंकार नको देहीं । आशा तृष्णा माया लज्जा चिंता कांहीं । वास पंढरीचा जन्म सदा देईं । आणीक दुजें मागणे तुज नाहीं ॥ध्रु॥
नाम अखंड हृदयीं राहो वाणी । न पडो विसर क्षण जागृति स्वप्नीं । संतसमागम ऐसा दें लावूनि । आणीक दुजें कांहीं नेणें तुजवांचूनि ॥३॥
पंथपुरिंचा रविसुत पुरे आतां । आड करावा भवसिंधु ऐसा नव्हता । नाहीं अडथळा त्रैलोक्यामाजी सरता । विनवी तुकयाबंधु चरणी ठेवूनि माथा ॥४॥
परि तो त्या विशेष मनुष्य होऊन । करी खंड मान वडिलांचा ॥ध्रु॥
बेरसा गाढव माय ना बहीण । भुंके चवीविण भलतेंचि ॥३॥
तुकयाबंधु म्हणे बोकड मातले । न विचारितां आपुले तोंडी मुते ॥४॥
अपमानिले जेणें श्रेष्ठांचे वचन । तेचि त्याची खूण ओळखावी ॥ध्रु॥
मद्यपी तो पुरा अधम जातीचा । तया उपदेशाचा राग वायां ॥३॥
तुकयाबंधु म्हणे पिसाळलें सुनें। आप पर तेणें न विचारावें ॥४॥
काय धाक आम्हां कासयाची चिंता । ऐसा तो असतां साहाकारी ॥ध्रु॥
शंखचक्रगदा आयुधे अपार । वागवितो भार भक्तांसाठीं ॥३॥
पांडवां जोहरी राखिले कुसरी । तो हा बंधुचा कैवारी तुकयाच्या ॥४॥
‘राम’ म्हणतां कर्म तुटेल भवबंधन । नये श्रम शीण स्वप्नामाजी ॥ध्रु॥
‘राम’ म्हणतां जन्म नाहीं गर्भवास । नव्हे दारिद्र्यास पात्र कधी ॥३॥
‘राम’ म्हणतां यम शरणागत बापुडें । अढळपद पुढे काय तेथें? ॥४॥
‘राम’ म्हणतां धर्म घडतीं सकळ । तिमिरपडळ नासे हेळा ॥५॥
‘राम’ म्हणतां म्हणे तुकयाचा बंधु । तरिजेल भवसिंधु संदेह नाहीं ॥६॥
चुकविली दु:खें मायेचा वोळसा । तोडोनियां आशापाश तेणें ॥ध्रु॥
केली काया तनु हिंवसी शीतळ । चिंता तळमळ नाहीं ऐसी ॥३॥
काळे तोंड काळ करूनि राहिलें । भूतमात्र झालें सज्जनसखें ॥४॥
तुकयाबंधु म्हणे अवघ्या दशदिशा । मुक्त रे परेशा तुझ्या पुण्यें ॥५॥
असों दे मोकळी जिव्हा जरि गाईल गुण । नाहीं तरि खिळून टाकी परती ॥२॥
मातेचिया परी देखती परनारी । ठेवी नेत्र तरी नाहीं तरि नको ॥३॥
तरी बरें कंटाळा करिती निंदास्तुतीचा । नाहीं तरि कानांचाही देखे प्रयत्न ॥४॥
सकळ इंद्रियांचा निग्रह करूनि, एक । राखावीं, पृथक तोडोनि भ्रम ॥५॥
तुकयाबंधु म्हणे तेचि वाट प्राणां । पडतां नारायणा विसर तुझा ॥६॥
परउपकारी वेचियेल्या शक्ति । तेणें आत्म-स्थिती जाणितली ॥२॥
द्वैताद्वैत भाव नाहीं जया चित्तीं । तेणें आत्मस्थिती जाणितली ॥३॥
जयाचिये वाचे नये निंदास्तुती । तेणें आत्मस्थिती जाणितली ॥४॥
उचित अनुचित जाणे धर्मनीति । दृढ भावभक्ति मानव तो ॥५॥
तुकयाबंधु म्हणे वरकड ते येर । संसाराचे खर भारवाही॥६॥
उत्पत्तिसंहार करिता जो पाळण । तो नंदा नंदन म्हणवीतसे ॥ध्रु॥
असूर तोडरी दैत्यांचा काळ । झाला द्वारपाळ बळीचा तो ॥३॥
लक्षुमीचा स्वामी क्षीराच्या सागरा । उच्छिष्ट कवळा पसरी मुख ॥४॥
तुकयाबंधु म्हणे चतुरांचा रावो । भावे तो पाहा हो केला वेडा ॥५॥
भला पुंडलिका भला । महिमा नवजाय वर्णिला । दगा देऊनि अवघियांला । सांठविलें अविनाश ॥ध्रु॥
केलें एके घरीं केणें । भरलीं सदोदित दुकानें । दुमदुमिलीं सुखाने । हे भाग्याची पंढरी ॥३॥
तुकयाबंधु म्हणे किल्ल्या । संतांचे हाती दिल्या । अंगावेगळे आपुल्या । टाकूनि झाला मेहेमान ॥४॥
॥ पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥
संपूर्ण वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण अनुक्रमणिका
ज्यांना प्रत्यक्षात ग्रंथावरून पारायण करायचे आहे त्यांनी खालील लिंकवरून ग्रंथ मागवावे.





