१) नारायण आपल्या बरोबर आहेत.

नारायण आपल्याबरोबर आहेत.

जो नारायणाला आपल्या जीवनाचा संचालक-दिग्दर्शक बनवून व्यवहाराच्या रणांगणात अवतीर्ण होतो, तो यशस्वी होतो आणि जो एकटा येतो; तो नष्ट-भ्रष्ट होतो.
ही तुमच्या दैनंदिन जीवनाची घटना आहे. मदनमोहन मालवीयांबद्दल मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितले असेल. ते म्हणत असत की, “तुम्ही घरातून कोणतेही काम करावयास निघालात तर ‘नारायण! नारायण! नारायण! नारायण!’ असे चार वेळा म्हणून जात जा.” त्यामुळे असे होईल की, जशी एखादी नदी वाहत आहे अथवा कालवा प्रवाहित आहे आणि जर त्यांचा मूळ उगमाशी संबंध सतत असेल, तर मग ती नदी अथवा तो कालवा कोरडा होत नाही; परन्तु जर अशी कोणतीही नदी अथवा कालवा असेल की, ज्याचा त्याच्या मूळ उगमाशीच कोणताही संबंध नसेल तर ती नदी किंवा तो कालवा कोरडा होऊन जाईल. याप्रमाणेच ह्या जीवाची गोष्ट आहे. त्याचे मूळ उद्गमस्थान नारायण, परमेश्वर आहे. जर हा जीव परमेश्वराबरोबर संबंधित राहून संसारात व्यवहार करील, तर त्याची शक्ती तशीच कायम राहील. परमेश्वराबरोबर नित्य संबंध ठेवल्यास आपल्याला सतत तीन गोष्टी मिळत राहतील –

  1. आपला जीवन-प्रवाह कधीही विच्छिन्न होणार नाही.
  2. बुद्धी वृद्धिंगत होत जाईल. आपली बुद्धिमत्ता कधीही संपणार नाही.
  3. आपल्या जीवनात नेहमी आनंद असेल.

आणि; त्याउलट, जर तुम्ही भगवंताशी संबंध तोडून टाकला तर जीवनाचा प्रवाह खंडित होईल; आपला ज्ञान प्रवाह, बुद्धिप्रवाह, आपली प्रज्ञा क्षीण होऊन जाईल; आणि तुमच्या ठिकाणी जो आनन्द येत होता, तो येणे थांबेल आणि मग तुम्ही उधार आनंद घ्यावयास लागाल. तेव्हा तुम्ही औषधांपासून जीवन घेण्यास सुरूवात करता, आपण पुस्तके आणि इतर लोकांकडून बुद्धी-ज्ञान घेण्यास सुरुवात करता आणि विषय-भोगातून आनंद घेण्याचा प्रयत्न करता – ह्याचा अर्थ असा होतो की, आपल्या आतमध्ये ज्ञानाचा, जीवनाचा आणि आनंदाचा जो मूळ स्रोत आहे, त्यापासून आपण विच्छिन्न झालेलो आहोत.
आम्ही असे समजतो की, आपण इतर सर्व गोष्टी विसरलो तरी चालेल; परंतु हे जे आमचे दृश्यमान मनुष्य शरीर आहे, त्यामध्ये समष्टीचा स्वामी परमेश्वर स्थित आहे, हे विसरता कामा नये.
जे मोठ-मोठे लोक आहेत, मोठ-मोठे व्यापारी आहेत, मोठे विचारवंत आहेत, ते नारायणाला विसरतात. दुर्योधन रणभूमीवर गेला; परन्तु तो नारायणाला बरोबर घेऊन गेला नाही; अर्जुनाने मात्र रणभूमीवर नारायणाला बरोबर नेले. तेंव्हा, गीतेच्या वतीने आम्ही आपणास निवेदन करतो की, ‘तुम्ही कोणतेही काम करा; पण एकटे, असहाय्य हीन-दीन मनुष्यरूपात करू नका, तर नारायणाला आपला साथीदार बनवून त्याच्या मदतीने कार्य सुरू करा, तुम्ही असहाय्य आहात असे समजू नका, तर तुम्ही कोणतेही काम करीत असताना नारायण आपल्या बरोबरच आहेत असे समजा!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top